मुलीनं वयाच्या ६ वर्षांपासून बंद खोलीत काढली २० वर्षे; सुटकेनंतर अधिकाऱ्यानं दिली धक्कादायक माहिती
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात एका मुलीनं बालपणापासून २० वर्षे तुरुंगात काढली आहेत. तिच्या सुटकेनंतर समाज कल्याण अधिकाऱ्यानं धक्कादायक माहिती दिली.

बस्तर (रांची) – जर आपल्याला कोणी अर्धा तास खोलीत कोंडले तरी नक्कीच खूप भीती वाटेल. पण, एका मुलीनं २० वर्षे अंधार असलेल्या खोलीत घालविली आहेत. या खोलीला खिडकीदेखील नव्हती. तसेच तिला बोलण्यासाठी कुणीही येत नव्हतं. तिची काय स्थिती झाली असेल? धक्कादायक बाब म्हणजे मुलगी २० वर्षे खोलीत कोंडून राहत असताना पित्यानं कोणतंच पाऊल उचललं नाही.
पीडित मुलीचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पीडिता सहा वर्षांची शाळेत जात असताना तिला गावातील तरुणानं मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मुलगी एवढी घाबरली की तिनं सगळ्यांशी बोलणं बंद करून टाकलं.
पीडितेची सुटका झाल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या उपसंचालक सुचित्रा लकडा यांनी सांगितलं, मुलीच्या मनात एवढी भीती होती की, तिनं खोलीत स्वत:ला बंद करून घेतलं. तिच्या पित्यानंही मुलीला खोलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. धमकी दिलेल्या तरुणाकडून मुलीला काही अपाय होऊ नये, यासाठी पित्याला काळजी वाटत होती. केवळ जेवण देण्याकरिता दरवाजा उघडला जात होता. पीडित मुलीची वेळीच सुटका झाली असती तर तिचे जीवन दु:खी झाले नसते, असे अधिकारी लकडा यांनी म्हटलं.
महिला अधिकाऱ्यांनं सांगितलं, सहा महिन्यांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांकडून आम्हाला माहिती मिळाली. आयुष्य कमी राहिलं आहे, असे सांगत त्या पित्यानं मुलीला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार गेल्यानंतर मुलीला घरातून बाहेर काढले. तिला डोळ्यानं दिसत नव्हतं. कानानं ऐकण्यालादेखील अडचण येत होती. मानसिकदृष्ट्या खचलेली होती. पीडित मुलीला कोल्चूर ग्राममधील आश्रमात ठेवलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे. ती आता हळूहळू चालणं, बोलणं आणि खाण्याकरिता शिकत आहे. तिला आता बोलता येत आहे. तसेच काही विचारलं तर स्मित हास्य करून उत्तरदेखील देत आहे.
सुचित्रा लकडा यांनी सांगितलं, “मुलीच्या पित्यानं आम्हाला सांगितलं होतं की, ती माणसे पाहिल्यावर खूप घाबरते. म्हणून आम्ही तिला ते समजावून सांगितलं आहे. तिचं सतत समुपदेशन करत आहोत. मुलगी आता रोजची कामे स्वतः करू लागली आहेत. तिचा मोठा भाऊ आणि वहिनी गावापासून थोड्या अंतरावर राहतात. या कुटुंबातील सदस्यांनादेखील कधीही काळजी केली नाही. ६ वर्षाांपासून २६ वर्षांपर्यंत खोलीत काढली आहेत. एका चुकीमुळे तिचे बालपण कोमेजून गेल्याचं आम्हाला वाईट वाटते. आम्ही तिचं बालपण परत आणू शकत नाही. परंतु, भविष्यात चांगलं जीवन जगण्याकरिता निरोगी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
- समाज कल्याण विभागावर विश्वास- मुलीची कहाणी ऐकल्यानंतर समाज कल्याण विभागाचे कर्मचारीही भावूक झाले आहेत. तिचे आयुष्य पुन्हा रुळावर यावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तिला डोळ्यांनी परत दिसावे, याबद्दल आम्ही डॉक्टरांशीही सल्लामसलत करत आहोत, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.
जर तुमच्या मुलाला कोणी धमकावत असेल तर काय करावे
- तुम्ही सुरक्षित आहात, अशी मुलांना खात्री द्या. त्याला वाटणाऱ्या चिंता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून ऐकल्या जात आहेत. त्यांचे निराकरण केले जात असल्याचा मुलामध्ये विश्वास निर्माण करा.
- मुलावर विश्वास ठेवा आणि त्यांना पाठिंबा द्या. भावनिक आधार द्या. मुलांकडून संपूर्ण माहिती घ्या.
- मुलाबद्दल असलेल्या धमकीबद्दल तपशील गोळा करा. गुन्हेगार ओळखून पोलिसांची मदत घ्या.
- तुमच्या मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्या.
- तुमच्या मुलाशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधून मोकळेपणाने बोला. त्यांना भावना व्यक्त करण्याठी आणि चिंता व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करा.
- जर तुमच्या मुलाला चिंता किंवा त्रास वाटत असेल तर समुपदेशकाचा सल्ला घ्या.

